Chandrapur : धारिवाल कंपनीची उच्चस्तरीय समिती मार्फत चौकशी होणार ; उद्योग मंत्री उदय सामंत यांचा विधानसभेत घोषणा

Chandrapur : धारिवाल कंपनीची उच्चस्तरीय समिती मार्फत चौकशी होणार असल्याची घोषणा उद्योग  मंत्री उदय सामान यांनी केली . चंद्रपूर तालुक्यातील  ताडाली येथील MIDC परिसरात धारिवाल पावर प्लांट च्या विविध समस्या संदर्भात महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडली आहे. त्यावर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिलेल्या उत्तरावर समाधानी नसल्याची प्रतिक्रिया आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी दिली. या पावर प्लांट च्या संदर्भात एक समिती गठीत करून चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली होती. त्यावर उतरताना झालेली कंपनीने केलेल्या प्रदूषणासंदर्भात हवाल सादर करण्यासाठी सहसचिवांच्या माध्यमातून नवा दिवसाच्या आज चौकशी केली जाईल आणि त्यावर सदर कंपनी दोषी आढळल्यास शासनामार्फत कारवाई करण्यात येईल असे आश्वासन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिले.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ ,ताडाली ,  ता. जी. चंद्रपूर हा कोळशावर आधारित असलेले औष्णिक विद्युत प्रकल्प कार्यान्वित आहे. सदर प्रकल्पामध्ये 600 मेगा व्हॉट वीज निर्मिती होते .धारिवाल पावर प्लांट अस्तित्वात आल्यापासून प्लांटमध्ये जुन्या मशिनरीचा वापर होत आहे प्लांट मुळे सभवाल त्याच्या परिसरात प्रदूषण होत असल्याचे माहिती जुलै महिन्यात निदर्शनास आली. या प्लांट द्वारे वर्धा नदीच्या पात्रातून पाणी चोरी केली जाते या प्लांट मुळे तयार होणारी राख शेतकऱ्यांच्या शेतात पासून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे कंपनीद्वारे शेतकऱ्यांच्या कुठल्याही मदत मिळत नाही या कंपनीमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन वारंवार अपघात होत असतात. त्यामुळे या कंपनीवर  सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी यांनी केली आहे.

धारिवाल विद्युत प्रकल्पाला जो पाणीपुरवठा वडा या गावातून होतो त्या गावातील नदीपात्रात या कंपनीने अवैद्य इंटक वेल बांधलेला आहे. कुठल्याही विद्युत प्रकल्पाचा इंटकवेल हा नदी पात्रता नसतो, कंपनीने पुन्हा चार पंप अवैधरित्या नदीच्या खोल भागात प्रवाह बदलून टाकला असल्याने उन्हाळ्यात आसपासच्या गावांना पिण्याच्या पाण्याचा व जनावरांसाठी पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे.
धारिवाल कंपनीच्या वायू प्रदूषणामुळे लगतच्या दहा ते पंधरा गावांना विविध आजारांनी ग्रासले आहे शेत पिकांवर सुद्धा कोळशाच्या राखेचा थर जमा होऊन शेत नापीक होत असल्याचे दिसून येते .धारिवाल विद्युत प्रकल्पा चंद्रपूर नागपूर राज्य महामार्गावर स्थित असल्याने सदर प्रकल्पात येण्या जाणारे ट्रक व वेहिकल हे राजा महामार्ग उभे राहतात. त्यामुळे वाहतुकीचा देखील गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे या जळ वाहनांमुळे अनेक अपघात झाले आहेत सदर कंपनीवर कारवाई करण्याची मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर केली आहे.

BJP आमदार आशीष शेलार असमाधानी
 उद्योग मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरावर भाजपाचे आमदार असे शेलार यांनी मत व्यक्त करताना मंत्र्याच्या उत्तरात तफावत असल्याची बाब  सहभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. सदर कंपनीने प्रदूषण केल्याचे स्पष्ट झालेले असताना पुन्हा चौकशी करून कारवाई केली जाईल असे दिलेले आश्वासन संयुक्तिक वाटत नाही ,अशी टीका देखील शेलार यांनी केली आहे.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.